चारोळी माझी कधी खोल कधी उथळ
तर कधी शब्दांची अडगळ
तर कधी नुसतीच ध नी मा ची जोडगळ
कधी दाखवितो निसर्गाचे चक्र, वर्णून झाडांची पानगळ
तर कधी भासवितो पर्णरहिन वृक्ष अजागळ
जेव्हा वृत्तीत असते भरभरून मरगळ
एकंदर काय, हे आहेत फक्त शाब्दिक गळ
विचारवंतांनी काढलाय केव्हाच पळ
हि चारोळी संपविण्यास गाठला आता वैचारिक तळ
No comments:
Post a Comment