लाडू खाण्यास आतुर,
नाही कुणीच चिंतातुर
चिंतनात लाडवाच्या, काढला दिवस उपवासाचा,
क्षणोक्षणी मेंदू होऊ पहात होता फितूर.
वरवर जरी उपवास इच्छाशक्तीला
करीत होता तो जी हुजूर जी हुजूर ॥१॥
तरलो कसा बसा खाऊन साबुदाणा, भगर.
पोटात तरी ओरडतंच होते कावळे,
दिला त्यांनाही नैवेद्य सुका मेव्याचा,
टाकून प्रामुख्याने काजू नी खजूर ॥२॥
आषाढीच्या दिवशी बाळगले मनात हेच विचार,
न लागू देता कुणास ताकास तूर।
पांडुरंगही हसून विचारतो,
"किती रे होऊ पहातोस चतुर?" ॥३॥
तो प्रेमळ, करीतो तरीही तोच कृपा,
व्यावसायिक जगातही तो,
निःशुल्कच करतो दूर, सगळीच कसूर! ॥४॥