तुझ्या लेखी घडला असेल गुन्हा
तरी मी करणार तेच पुन्हा पुन्हा
वाटेल ती लावा कायद्याची धारा
मी भिजणार मनसोक्त येताच वर्षाधारा
कायद्याचं म्हणाल तर काय द्यायचं बोला
कांद्यांची भजी आणि चहाचा ठेला
नकोच घरी तळण्याचा झमेला
चल बरोबर, नाही तर मी निघालो एक अकेला
पुन्हा आलीच जर पावसाची सर
तितक्याच सहजतेने येईल मला लहर
लहरीपणामुळेच केल्या समुद्राच्या लहरी पार
जीवनात आला किती मोठा कहर
जीवंत लहरी मन असेल सतत हजर
सांगण्याचा मुद्दा, आला पाऊस
खा भजी फिटेपर्यंत हौस
आपल्या आत जरी असला देव,
आपण शेवटी हाडामासाचेच माणूस
घ्या उपभोग मनमुराद
जगा जीवन असं की सगळे देतील दाद
कुणास वाटलंच की भिजून घडला प्रमाद
वाटू देत त्यांना, ते त्यांचे त्यांचेच होतील बाद
No comments:
Post a Comment