इंद्रियांचेच सगळे चोचले,
कुणाचे चोचले कधी कसे कुणास बोचले;
तोडीत लचके, बनूनी लांडगे,
लागले लगेच हिणवू, बनूनी कोल्हे
होणार नक्की अधोगती, दाखवू लागले भीती. ॥१॥
जेथे खुंटते मती,
तिथे सुरू होते प्रीती;
प्रीतीची होताच प्रचिती,
नाहीशी होते अस्तित्वाची भीती ॥२॥
बागूलबुवा नैतिकतेचा, वाजविता होई फजिती,
गंमत सगळी, सगळीच माती,
होते जेव्हा अनुभूती;
जो येतो, तो जातो
तरी म्हणतो ठोकूनी छाती,
"माझीच चोख नीती, मीच घडवेन क्रांती!"
होईल आता इथेच उत्क्रांती ॥३॥
नको क्रांती, नको उत्क्रांती; हवी फक्त शरणागती
निरुपयोगी ठरेल, केली जरी ब्रह्मांड भ्रमंती,
विरली सगळीच भ्रांती, हरी नामातच अखंड शांती॥४॥
No comments:
Post a Comment