माझ्या सगळं लक्षात आहे अजून ..
अजूनपर्यंत जे लक्षात आहे तेच सर्वस्व
This blog is to say Hello to the world of Blogs :) Yeah, now i am going to get my thoughts across to you people out there even faster and efficient way. Hope you find this helpful and interesting.. Keep Blogging :)
काळाचं समिकरण सोडवायची गरज नाही ते जुळवण्याची जवाबदारी काळाचीच. वेळ येताच ते जुळणार हे नक्की आपल्याला ते फक्त समीकरण समजलं पाहीजे समजल्याने ते बदलणार नाही, पण जीवन सुसह्य होईल. श्वास घेता येण महत्वाचं, त्यासाठी हवा दिसण्याची गरज नसते, पण जीव वीयूचं प्रमाण कमी होतय हे कळलं तर दीर्घ श्वसन करुन ते सुसह्य होण्याईतपत समज असणे गरजेचं आहे. गरजेच म्हणजे, समजलं तर जीवन सुसह्य होईल … नाही तर जे व्हायचं ते होणारच आहे … शेवटी भौतिक जग हे भौतिकशास्त्राच्या नियमानेच चालणार, आणी जीवाने कितीहि उड्या मारल्या तरी त्या जीवशास्त्र्यांच्सा नियमा पुढे तोडक्याच पडणार … पण या सगळ्यांचा समतोल — काळाच्या समीकरणाने रहाणार.
चकणा, दारु जोडीला सिगरेट
जुन्या मित्रांबरोबर अशीच असते गाठभेट
खादाडी त्रिकुटी मैत्रीची,
घटकाभर मौज, पुंजी जीवनाची
घालव वेळ वायफळ, जळू देत देह अंतरी
जन्मोजन्मीचा आहे हा फेरा, पाठीशी उभा धनवंतरी
जन्मतःच मृत्यु निश्चित,
न केलेल्या पापाचे
उगीचच का फेडत बसावे प्रायश्चित
असली कितीही थंडी
घालते ती फक्त छोटी चड्डी आणी बंडी
बघून तिला मलाही येत उसने अवसान
या राणीपाई नोकरीला मारेन मी ठोकर
बॅास ला सांगेन. मी नाही कुणाचा नोकर
घरी बसून विणेन मी लोकर
वाजलीच थंडी, तर
मी अन ती घालीन विणलेल्या लोकरीचा स्वेटर
येतो तो तो क्षण अमृताचा।
जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब
तुझें प्रतिबिंब लाळेगोडे।
सुखोत्सवें असा जीव अनावर
पिंजऱ्याचे दार उघडावे।
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं।
-बा.भ.बोरकर.
===========================
culinary explorations result into in Artistic expression
===========================
कर्माचा सिध्दांत
===========================
दुपारच्या जेवणामुळे रात्रीच सुरु झाली हगवण
संडासापर्यंत पोहचेतोवर मोजले १०० अमृतक्षण
पावलोपावली एकच होती धास्ती
थेंब थेंब म्हणता म्हणता चड्डी होतेय का पिवळी चिंब
दर्पणी न बघताच दिसले होते माझे मलाच खव्वयै प्रतिबिंब
सुखोत्सवें असा जीव अनावर पिंजऱ्याचे दार उघडावे
वाटत होते जोरात रडावे
मोकळीकतेने उडला फवारा
सगळेच संपले हेवेदावे
पसरताच सर्वत्र पुरावे
मनस्वी सोडला सुस्कारा
आतड्यांनीच जणू केला पुकारा
जगणार उद्या नक्की खाण्यास नव्याने चविष्ट कचरा
म्हणता म्हणता जातात सात वार
आठवून आठवून पावातले वडे
ठकलतो कसेबसे आठ आठवडे
संपतो आहे quarter म्हणत म्हणत
कण्हत कण्हत रिचवतो quarter
वड्याच्या दिवास्वप्नातच जातो आठवडा
अशी आहे आपली प्रथा
साजूक तुपात प्रसादाचा शिरा
तात्काळत वाट बघण्याची व्यथा
सांगावी कशी नी कुणाला
चिंतेने या ताणल्या मेंदूच्या शीरा
त्यातून गुरुजीही आले उशीरा
संयमाचे धडे मिळतात करून असली प्रतीक्षा
पण त्या त्यावेळी मात्र वाटते हि बळजबरीची शिक्षा
एक ना अनेक, आपल्या पंरपरांचा मोठा वारसा
काहींना लहानपणीच मिळते अशीच दिक्षा
काळ जात गेला तसा तसा जीव अडकत गेला
जीव अडकल्याने काळ जात गेला
काळ आणी जीव चा झाला गुंता
काळजीचा उत्पन्न झाला बागुलबुवा
केले मग अनेक पीर बाबा दारु दवा
काळजीला नाही काहीच उपाय
पाय वर करून पहूडण्यापलिकडे
उरलाच नाही आता पर्याय