Monday, June 02, 2025

विचारमंथन

 विचारमंथन 

=======================•

पुर्वी कामगार कामचुकारपणे का होईना काम बरोबर करीत असत

थोड्या कालावधी नंतर कर्तबगार मंडळी कामात जाणूनबुजून चुका करीत

धुरंदर व्यक्ती जशी जशी कामांची सुत्रे हाती घेऊ लागली काही बिलंदर मंडळी कामसुत्रात व्यग्र होऊ लागली 

काही म्हणू लागली कामात खाडे टाकले तरी चालतिल पण ईंगलिश खाडी पोहून पार करणार हे नक्की 

वयोमानापरत्वे कामेच्छा .. (शब्दशः) म्हणजे काम करण्याची ईच्छा कमी होउ लागली … 

मग कर्म करीत रहाणे कसे महत्वाचे आहे हे तरुण मंडळींना जतवण्यास व्याख्याने सुरु झाली… 

आणी याच कामातूरतेने जगरहाटी हि चालू राहीली….

No comments: